[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आधी सोसायटीच्या निवडणूका घेतल्यानंतर त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका घ्या.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आधी सोसायटीच्या निवडणूका घेतल्यानंतर त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका घ्या.

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदार असलेल्या प्राथमिक विविध विकास सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका प्रथम घ्याव्यात , नंतरच बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्या , असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिले . राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयास विविध सहकारी सोसायट्यांचे सभासद आणि संचालकांनी याचिका दाखल करून या निर्णयास आव्हान दिले . या याचिका न्या . संजय गंगापूरवाला व न्या . आर . एन . लड्डा यांनी
निकाली काढल्या . राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण बाजार समितींसह सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आले . प्राधिकरणाने २१ ऑक्टोंबर २०२१ रोजी राज्यातील निवडणुका बाजार समितींच्या घेण्यासंबंधी अधिसूचना जारी केली . निवडणुका २३ नोव्हेंबर २०२१ पासून पुढे तीन महिन्यात घेण्याचे निश्चित केले . राज्य प्राथमिक सहकारी सोसायट्यांचे संचालक बाजार समिती निवडणुकीत मतदार असतात . कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत . सोसायट्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली असून काहींचा कालावधी संपला आहे . बाजार समितीमध्ये सतरा संचालकांपैकी १४ संचालक सोसायटी मतदारसंघातून निवडून येतात . निवडणुका झाल्या नाही तर बाजार समितीमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व राहत नाही . यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अडथळा निर्माण होईल , असा युक्तिवाद खंडपीठात करण्यात आला . खंडपीठाने बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी सोसाट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देऊन याचिका निकाली काढली . याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड . सिद्धेश्वर ठोंबरे , अॅड . व्ही . डी . साळुंके , अॅड . शहाजी घाटोळ पाटील , अॅड . भारत लोंढे , अॅड . गोविंद इंगोले यांनी काम पाहिले . प्राधिकरणातर्फे अॅड . साहेबराव कदम , अॅड . विठ्ठल दीघे शासनातर्फे सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे तर बाजार समितीतर्फे अॅड . विशाल बागल , अॅड . मुरलीधर कराड यांनी बाजू मांडली . राज्याच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी निवेदन करताना सोसायट्यांच्या निवडणुकीनंतरच बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे राज्याला अभिप्रेत असल्याचे सांगितले .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या