शेतातील मिरची उपटली स्वताच्या हातानी..
मिरची , टोमाटो तसेच भाजीपाला व पिकांना भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेकांनी उसणवारी करून पैसे जमवून टोमाटो व मिरची लावलेली होती. मात्र उत्पादन जास्त व मागणी घटल्याने सगळ्याच पिकांचे भाव पडले.
उर्धुळ येथील शेतकरी श्री दत्तूमामा ठाकरे यांनी स्वताच्या शेतातील मिरची तोडून टाकली . सदर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
व्हीडोओ बघा :
शेतकऱ्याने मांडलेला हिशोब –
रोप लागवड – ११९००/-
मलचींग पेपर – १००००/- + मजुरी ५०००/-
खत – १५०००/- + औषधे – २००००/-
ड्रीप + टोकर – २००००/-
सुतळी – ३०००/- + बांधणी – १००००/-
शेतकऱ्याचे कष्ट – शून्य धरले तरी एकूण खर्च ९४९००/-
उत्पन्न -१६५००/-

