भोयेगांव ता .चांदवड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा भोयेगाव येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या बालचमुनी गावात दिंडी काढली तसेच शालेय आवारात रिंगण केले टाळ मृदुंगाच्या सहाय्याने अभंगांचा आस्वाद घेतला हरिनामाचा गजर केला मुलांनी व मुलींनी फुगड्या घातल्या वारीचा आनंद द्विगुणीत केला खऱ्या वारीचे प्रति रूप या बालमना पाहायला मिळाले गावात दिंडी जात असताना घरा- घरातील स्त्रियांनी बाल वारकऱ्यांचे औक्षण केले व वारकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला , या सर्व कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता पहिलीचे वर्गशिक्षक श्री जयेश सूर्यवंशी व इयत्ता दुसरीच्या वर्ग शिक्षिका सौ शितल अहिरे यांनी केले .
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पांडुरंग हे आराध्य दैवत आहे विठ्ठलाच्या या वारीला संपूर्ण महाराष्ट्रातून कोणालाही आमंत्रण ना देता अख्खा महाराष्ट् भक्तिभावाने चंद्रभागेच्या वाळवंटात गोळा होत असतो ही भागवत धर्माची व संताची परंपरा पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी त्याग व भक्तीचे संस्कार होण्याकरीता अशा उपक्रमाची आवश्यकता आहे असे उपक्रम शाळेत नियमित पणे राबवले जातात यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ , सरपंच व सदस्य यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते अशा विविध उपक्रमातून शाळेने गुणवत्तेचा एक नवा आदर्शच घालून दिला आहे . शाळेची हिच परंपरा कायम राहण्यासाठी सर्वच शिक्षक तळमळीने कामं करतात .
सदर कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामस्थ भजनी मंडळ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला शेवटी सूर्यवंशी जयेश यांनी सर्वांचे आभार मानून आनंद अधिक द्विगुणीत केला .यावेळी सौ उषाताई केदारे सरपंच
सौ संगीता ठोंबरे उपसरपंच , गोरख बोरसे अध्यक्ष , संजय गलांडे उपाध्यक्ष निवृत्ती आहेर चंद्रकांत वारुळे ब्रम्हेश कदम केशव वाकचौरे बाबू शिंगणे मंजूषा लोखंडे सोनाली पाटील सुवर्णा धोंडगे शितल अहिरे जयेश सुर्यवंशी यांनी दिंडीचे नियोजन करून उपक्रम यशस्वी केला .


होण्यासाठी असे उपक्रम नियमित शाळेत राबवले जातात त्यातून नक्कीच चारित्र्यवान पिढी निर्माण होईल यात शंका नाही .